नमस्कार,

           तुम्ही मुद्दे मांडलेच कुठे फक्त शिवसेनेवर आगपाखड केली आहे. जेव्हा अति होते तेव्हाच समाजात असंतोष  उफाळून येतो नाहीतर समाज स्वस्थच असतो . बाळासाहेबांनी तेव्हा म्हणजेच चाळीस वर्षापुर्वी मराठी समाजाच्या त्या असंतोषाला वाचा फोडली आणि शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनेची स्थापना कशी झाली ते तुम्हास सांगण्याची गरज नाही. शिवसेना आहेच म्हणुन मुंबईत मराठी माणुस टिकून आहे.नाहीतर केव्हाच मुंबई केद्रशासित झाली असती. वरिल शपथपत्रात आता म्हणजेच काळानुसार बदल सुचवा. उगाचच काहीही बरळू नका. हे शपथपत्र (पण काळानुसार बदल करून)प्रत्येक मराठी माणसाने पाळायला हवे की नाही ते सांगा. कृपा करुन पुर्ण शपथपत्र नीट वाचा.

याबाबत उदाहरण द्यावयाचे झाल्यास नुकतेच  झालेले राज ठाकरे यांचे प्रकरण व उत्तर भारतीय संजय निरुपम यांनी मराठी मुंबईतच राज ठाकरे यांना दिलेले आव्हान याबाबत काय बोलायचे ते सांगा. यांच्या राज्यात याबाबत आपण काही बोलू शकलो असतो का. यांची दादागिरी आपण का खपवुन घ्यायची. आसामम्ध्ये जेव्हा उल्फाने बिहारी मजुरांना मारले तेव्हा कुठे होता संजय निरुपम, कृपाशंकर सिह.

आपला

कॉ.विकि