पिंपळाच्या पानगळीची सल आणि त्याच्या बहरण्याचे सुख... सर्वसाक्षी, तुम्ही तर एक गद्य कविताच लिहिली! माझ्या लहानपणी आमच्या घराशेजारी एक भलाथोरला पिंपळ होता. आमच्या शेतात आजही एक महाप्रचंड वड आहे. ते दोन्ही महापुरुष आठवले!
अश्या गोष्टी मुलींनाच सुचतात आणि जमतातही
असेच काही नाही. 'कहीं दूर जब दिन ढल जाये' मधल्या आनंदच्या शायरीच्या पुस्तकातही सुकलेले गुलाबफूल असते!
गोल चेहेऱ्याच्या, मोठ्या आणि घारोळ्या डोळ्यांच्या आणि कपाळावर चंद्रकोर रेखलेल्या त्या ठमीला मला ते पान आवडल्याचे ल्क्षात आले. लगेच नाकाचा शेंडा वर गेला. मग तिला काय वाटले कुणास ठाउक, पण 'आवडले का तुला?' असे विचारत आणि माझा होकार गृहित धरुन तिने कर्णाच्या औदार्याने ते मला देउन टाकले! वर 'नीट जपून ठेव' असा सल्लाही दिला.
हम्म... अशा जखमा लवकर बऱ्या होत नाहीत हो! एखाद्या ढग भरून आलेल्या संध्याकाळी सळसळत्या पिंपळाकडे बघताना काहीतरी भळभळू लागेल. उगीचच 'जब छाये कहीं सावन की घटा, रो रो के न करना याद मुझे' आठवेल.क्षितिजावरची फिकट चंद्रकोर दुसऱ्या एखाद्या चंद्रकोरीची आठवण देऊन जाईल! चालायचंच!