लेख आवडला. प्रत्येक गाडीचा विशिष्ट प्रवासीसंग्रह, 'आतले आणि बाहेरचे' हे अगदी पटलं.

जुन्या आठवणी जाग्या झाल्या. ३०/३५ वर्षांपूर्वी डोंबिवली ते घाटकोपर प्रवास ८:३२ च्या लोकलने काही वर्षे केला होता त्याची आठवण झाली. परतीची गाडी ठरलेली नसायची कारण कचेरीची ठराविकच बस नेहमी मिळेल याची खात्री नसायची. पण परतीचा प्रवास मी आणि माझी ठाण्याला रहाणारी मैत्रीण पहिल्या वर्गाच्या महिलांच्या डब्यातून करायचो. ठाण्याला बहुतेक महिला उतरून जात. त्यामुळे मी चटकन उतरून शेजारच्या जनरल डब्यात चढत असे. (मंदा पाटणकर मृत्यू/खून प्रकरण तेव्हा नवीन होते.)ठाण्याला डबा रिकामा होत असे ही धादांत थाप आहे असेच आता वाचणाऱ्याला वाटेल. पण हे खरे आहे. किती बदल झाला आहे हे कळावे म्हणून मुद्दाम सांगितले आहे.

लेखात म्हटले आहे त्याप्रमाणे गाडीमध्ये ओळखी व्हायच्या, इतर कुठे भेटलो तर स्मितहास्य, इकडे कुठे वगैरे होत असे. पण नाव माहीत असायचेच असे नाही. तशी जरूरही वाटायची नाही. असो. मुंबईची लोकल ह्या विषयावर खूप काही लिहिण्यासारखे आहे.