माधवी ताई,
- शब्द साधनेला निश्चितच काही मर्यादा असतील पण ते एक प्रहसन (फार्स) का वाटावे हे समजले नाही.
- आम्ही मनोगत हे व्यासपीठ एक प्रयोग शाळा म्हणूनच पाहतो, एकांगी विचार अथवा अव्यावहारिक विचारांची चाळणी व्हावी हाच उद्द्येश असतो आणि आहे. उलट अश्या वेगळ्या विचारातून आमच्या विचारातील तकलादू मुद्दे दूर व्हावेत हीच एक इच्छा असते.
- हा एक खेळ नसून एक प्रयोग आहे आणि याचे यशापयश काळ ठरवेल. याला जितके व्यापक स्वरूप ( वर्तमानपत्रातून अथवा चर्चेतून मिळेल) तितका हा प्रयोग यशस्वी होईल हे नक्कीच.
- लीनाजी अथवा विनायकराव अथवा आपण यासर्वांना मराठी भाषेबद्दल प्रेम आणि जिव्हाळा आहे हे नक्कीच. त्यामुळे कोणते विचार टिकतील हे पाहावे लागेल.
- ऐताहासिक दाखले याकडे आम्ही प्रेरणा अथवा प्रारूप म्हणून पाहतो. कोणतेही तत्त्व अप्रस्तुत कसे राहू शकतील?
तुमच्या लेखात एक मुद्दा आला नाही, मराठी भाषा काळाच्या ओघात राहील अथवा नष्ट होईल. आणि राहणार असेल तर अश्याच उपक्रमाद्वारे राहण्याची शक्यता आहे अथवा नाही? त्याही पलीकडे आपण काही सुचवले तर स्वागतच आहे.
आपल्या विचारांबद्दल आभार.
द्वारकानाथ