एकांगी नाही. तसे असते तर आपल्या मुद्द्यांत अतिशयोक्ती नाही असे म्हटलेच नसते. आपले मुद्दे अजीबात चुकिचे नाहीत, परंतु मी ८ वि. २ असे मुद्दे जरूर घेतले.

आपण आपले निरीक्षण लिहिताना ते जर आपल्यापुरते लिहिलेत तर त्यालाही एकांगीच म्हणावे लागेल नाही काय? मुलींसाठी "हट्टीपणा" हा शब्दप्रयोगही आपण वापरलात, हट्टीपणा ही काय बायकांची मक्तेदारी आहे का? पुरुषही तेवढाच हट्टीपणा करतात की. 'गोरी आणि सुंदर बायको हवी' अशी सर्रास जाहिरात बघतातच की सगळे, यात म्हटले तर  बिघडत कोठेच नाही म्हटले तर कोणालातरी आपण दुखवत असतो, पण ज्याचे त्याला ठरवू द्या ना.  इथेही जर शिकल्या सवरल्या मुलींना त्यांच्या काही आवडीनिवडी असतीलच, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चुकीचा आहे परंतु अतिरेक, हट्टीपणा मुलीच करतात असे आहे का?

सार्वजनिक मंचावर लेख लिहिताना आपण आपला स्वानुभव लिहिलात तरी तो अनेकांना न पटण्याची शक्यता असतेच. 

आता आपल्याच मुद्द्यांकडे वेगळ्या प्रकारे पाहा.

१. पैसा कोणाला नको असतो? मग मुलीच त्या पाहतात असा ग्रह का बरे? जगातला प्रत्येकजण पैशाचा विचार करतो. (साधू-संतांना सोडावे.)
२. एकत्र कुटुंबात राहून सासू सासऱ्यांची जबाबदारी घेणार नाही, मला स्वतंत्र संसार करायचा आहे असे त्या मुलीला वाटत असेल तर नक्की काय चुकले? लग्न झाले म्हणजे सासू सासऱ्यांबरोबर राहिलेच पाहिजे असा कायदा तर नाही.
३. हल्ली मुलीही एकुलत्या एक किंवा एखाद-दोन असतात. अशावेळेस एखाद्या मुलीला आपले आईवडिल आपल्याच जवळ असावेत असे वाटले तर काय बिघडले?
४. क्रेडिटकार्ड, मोबाईल या हल्ली गरजा होऊ लागल्या आहेत असे ऐकते.
५. ५'८" हवा की ऋतिक रोशनसारखा देखणा हे तिचं तिला ठरवू दे ना. लग्न करायचे आहे ना, साडी घ्यायची झाली तरी बायका ५० दुकाने फिरतात.
६. अहो हे तर दोन्ही बाजूंनी होते नाही का? उच्चपदस्थ बायको हवी असते पण तिने रात्रीबेरात्री ऑफिशियल पार्ट्यांना गेलेले नको असते, इ. इ.
७. हा मुद्दा  विशेष लिहिण्यालायक असल्यासारखा वाटत नाही. (साडी नेसणारी काकूबाई मलाही बाळोबा करून टाकेल असे म्हणणारा पुरुषही भेटेल.) खास बायकी मुद्दा वाटत नाही.
८. मुलीच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने निदान नवरातरी आपल्याला चांगला कमावणारा मिळावा अशी तिची इच्छा असेल.

मी ही वरील मुद्द्यांना बरोबर म्हणत नाही. परंतु लग्नाच्या बाजारात दोन्ही बाजू कमी-अधिक परंतु अशाचप्रकारे वागत असतात. जे मुद्दे आपण लिहिलेत तेच किंवा त्याच्या दुप्पट तिप्पट मुद्दे मुलीही लिहितील कारण त्यांनाही असे वेडेवाकडे अनुभव आलेले असतील. ठरवलेल्या लग्नात जी माहिती कळते ती अगदी वरवरची असते आणि बरेचदा प्रेमविवाहातही हेच होऊ शकते. जर संपूर्ण माहिती मिळती तर ठरवलेले/ प्रेमविवाह आमचे जमत नाही या कारणास्तव मोडलेच नसते.

पूर्वी मुलगी खपवायची म्हणजे बापाला जोडे झिजवावे लागत असे म्हणत. मुली शिकल्या, कमवत्या झाल्या, त्यांचे बालविवाह बंद झाले, आईवडिलांच्या अपत्यांची संख्या कमी झाली, पर्यायाने मुलींना आपला जोडीदार कसा हवा याची जाण येऊ लागली, हल्ली मुलीच्या बापासारखेच मुलांचे बापही जोडे झिजवत असावेत, यातही फारसे काय चुकीचे? लग्नाच्या बाजारात घोडे, गाढवे, तट्टू मिळायचेच. त्यामुळे मुलींनी काय करावे यापेक्षा लग्नेच्छूंनी काय करावे असे आपण ८+२=१० मुद्दे लिहू शकला असता असे वाटते.