टग्या यांच्याशी पूर्ण सहमत. आणखी काही लिहिण्यासारखे नाहीच. स्त्रिया स्त्री-पुरुष समानता गृहित धरून विचार करू लागल्या आहेत आणि पुरुष बव्हंशी जुन्याच मानसिकतेत अडकलेले आहेत असे दिसते आहे.
आपले उत्पन्न कमी असताना जास्त उत्पन्न असलेल्या अशा वधूबरोबर लग्न करताना
अशी अनेक उदाहरणे माझ्या आजुबाजुला घडली आहेत. त्यातले एखादेच विभक्ततेच्या मार्गाने गेले. बाकी संसार चांगले सुरू आहेत असे दिसते. यातही मुख्य मुद्दा पत्नीचे काम जास्त आव्हानात्मक असल्याने, ती रात्री घरी उशीरा येणार, तिला कामानिमित्त देशापरदेशात जावे लागणार या गोष्टी स्विकारल्या तर जमते असाच वाटला.