उदा. जॉन्सनने लहान वयातच ग्रंथांची व्हालमेच्या व्हालमे वाचून टाकली होती.
आपणही अनेक शब्द असेच बिनदिक्कतपणे अहोरात्र वापरीतच आहो.
उदा. बँंकेतल्या टेबलावरच्या फायली. ... आणि असेच व्हायला हवे असे माझे मत आहे. आपल्याला संकोच वाटण्याचे काहीही कारण नाही. अडचण येते ती सप्तमीचा 'त' हा प्रत्यय लावताना. ज्या परकीय शब्दांना हा प्रत्यय सहजपणे लावता येतो (सामान्य रूप करून) ते शब्द मराठी 'विनासंकोच' नांदायला लागतात. इतर कायम परकीयच राहतात. काही प्रमाणात अनेकवचन करण्याच्या बाबतीतही असेच होते. अनेकांना परकीय शब्दांची अनेकवचने मराठीप्रमाणे करायला नको वाटते. (इंग्रजीत मात्र पेढा चे अनेकवचन पेढे असे न करता ते त्यांच्या पद्धतीने 'पेढाज' करतात असे ऐकतो. अशी अनेक उदाहरणे सापडतील.) मात्र ह्याला आपला न्यूनगंड म्हटले कीमाणसे दुखावतात.
गंमत म्हणजे शास्त्रीबोवांसारखे विद्वान लोक इंग्रजी माध्यमातून शिकलेले होते. (इतकेच काय त्यांचे संस्कृत शिक्षणही इंग्रजी माध्यमातून झालेले असण्याची शक्यता आहे!) असे असूनही त्यांना असा संकोच कधी झाला नाही. मात्र अशी उदाहरणे दिली की 'ते मोठे लोक होते! ... आपण सामान्य लोक आहो....' असे म्हणून ती बिनदिक्कत उडवून लावता येतात!
(तपशीला बाबत चू.भू.द्या. घ्या.)