माझे प्रतिसाद नीट वाचा.
मी दलित समाजाच्या विरुध लिखाण केलंच नाही आणि आरक्षणाच्या विरोधात ही नाही.
स्वतःचा विकास होत नाही म्हणून आमच्यावरच बोट ठेवाल तर तो आमच्यावरच अन्याय होईल.
मला त्रास होतो तो या मानसिकतेचा त्याच्यासाठी परप्रांतीय आणि मराठीच उदा. दिल आहे.
तुम्ही फारच गोंधळलेले आहात अस तुमच्या लिखाणावरून वाटत. कधी याच्याकडे
कधी त्याच्याकडे आणि आता तर चक्क माझ्याकडे बोट दाखवत आहात.
माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की अन्याय होत आहे हे दाखवत राहणं फार सोपं
असत पण तो सहन करून स्वतःचा विकास करणं तितकं सोपं नाही. आणि आता
कुठला अन्याय होतो आहे लोक टोमणे मारतात ते तर मलाही मारतात
परप्रांतीयांनाही मारतात आणि राजकारण्यांनाही मारतात. त्यासाठी हा भेद नको.
तुमचं म्हणणं मराठी माणूस आणि दलित मराठी माणूस यांत भेद करणारा कोण तर मराठी माणूस .
मला वाटत फक्त तुम्हीच आणि तुमची मानसिकता.
नाही हो अस नाही होत. मला कोणी टोमणा मारला तर मी ते स्वतःमद्ये बदल
घडवण्यासाठी प्रयत्न करेन. त्या टोमणा मारण्याला वेगळं करून किंवा स्वतः वेगळं
होऊन कस काय चालेल ?