ह्या विषया वरती गेल्या एक वर्षा पासून मनोगतावर चर्चा झडत आहेत (विकी यांनी नेहमीच हा मुद्दा मांडलेला आहे), पण आज माझ्या पिढीला (आणि आताच्या पण)हे दिवस का दिसत आहेत तर आपल्याच मराठी माणसांमुळे.

मुंबईतली घरे विकून ठाणे, डोंबिवलीतले पलायन, मराठी लोकांचे पाय मराठी लोकांनीच खेचणे, अमराठी व्यावसायिकांकडेच खरेदी करणे (ह्याला जबाबदार मराठी व्यावसायिकांचा मराठी बाणा), स्वतः पुढाकार न घेता कुठेतरी मदतीची अपेक्षा करणे.

इंग्रजाळलेले मराठी बोलणे, लिहिणे हे तर अनेकांना भूषणावह वाटते, पेठकर काकांनी अश्याच महाभागाला साध्या भाषेत समज दिली आहे काल (वाचा जीएस यांचे नवीन प्रवासवर्णन कनकेश्वर, खंदेरी, उंदेरी). असले महाभाग स्वतः इंग्रजी माध्यमात शिकलेल्याची सबब पुढे करतात. मागेच मी एका चर्चेत प्रतिसाद दिला होता की माझे स्वतःचे शिक्षण दिल्लीत अमराठी मुलां बरोबर दिल्लीतल्या शिक्षण व्यवस्थेत इंग्रजी माध्यमातच झाले आहे. तरी पण माझी स्वतःची भाषा अशुद्ध नाही आणि इंग्रजीच्या मदतीची गरज नाही पडत. त्यासाठी तसे घरातूनच संस्कार मला मिळाले. 

आता चर्चा करणे सोडा, इतिहासात रमणे पण सोडा आणि कृती काय करू शकतो ह्या वर भर द्या. मी आणि माझ्या सारखे बरेच तरुण तयार आहोत.