लहान मूल घर किंवा वडीलधाऱ्याना सोडताना केविलवाणे होतेच आणि त्याचे केविलवाणेपण आपल्याला पहावत नाही हे खरेच.आमचाही नातू आम्हाला सोडून पाळणाघरात जाताना असे केविलवाणे चेहरे करायचा की मी पत्नीला म्हणायचो अग,राहूदे ना घरीच आजच्या दिवस,आपण घरातच तर आहोत.पण ती त्याचे बारसे जेवलेली असल्याने ती क्वचितच माझे म्हणणे ऐकायची.जर मीच कधी पाळणाघरात सोडायला गेलो तर पाळणाघरात जाईपर्यंत तो घरी परतण्याचा प्रयत्न करायचा पण पाळणाघराच्या दारातून आत शिरताक्षणी त्याला आपला आजोबा बरोबर आला आहे याचा  पार विसर पडायचा आत गेल्यावर टाटा म्हटले तरी त्याचे लक्ष मसायचे एवढा तो आपल्या मित्रमत्रिणींमध्ये रमायचा !