कथा आपल्या अनुदिनीवर वाचली होती, आता परत वाचतेय.
या कथेतलं रिमाचं दार वाजवणं आणि आईने दार न उघडणं याने कथेला जास्त हृदयद्रावक टच आला आहे. ती घटना वाचून थोडीफार 'द मंकीज पॉ' ची आठवन येते.
अजूनही वाटतं की रिमाच्या मृत्यूचा थेट संबंध जर रोखलेल्या नजरेशी जोडला असता (सध्या ती लाईट डोळ्यावर येऊन ताबा सुटून मरते आहे.)तर कथा जास्त भीषण होऊ शकली असती.
(मागे एकदा 'अघोरी' नामक एक मालिका लागायची त्यात तीन जण असेच मांत्रिकांची पूजा विचलीत करतात आणि मग त्यांच्या शापाने एक एक करुन मरतात. त्यातला एक त्या साधूच्या अंगावर थुंकलेला असतो त्याला रक्ताच्या उलट्या होतात.)
एकंदरीत भयकथा शेवट सुखांत ऐवजी दु:खांत केला तर जास्त प्रभावी होतात असे तुमची ही कथा , 'आ ऽ ऽई' आणि 'इव्हिल डेथ-१' वरुन वाटते.