माधवराव आणि रावसाहेब,

या गोष्टीचे नाव अंधश्रद्ध असे ठेवण्याचे कारण की गोष्टीतील तीन पात्रे, १. आई, जी देवावर विश्वास ठेवणारी असली तरी थोतांडांवर नाही, मुलीला काही बरंवाईट होऊ नये या भीतीने तिला साधूचे शाप खरे ठरतील असे वाटू लागते. २. साधू, जो अशा विद्यांवर श्रद्धा ठेवतो आणि आपले शाप खरे ठरणार असे समजून चालतो. ३. रीमा, जी आधुनिक विचारांची, मानसशास्त्र वाचणारी, अशा गोष्टींना थोतांड समजणारी मुलगी आहे, परंतु काळजीचा पगडा भीतीत बदलून ती ही साशंक होते. अस्वस्थता, काळजी आणि भीती स्वतःला अश्रद्ध समजणाऱ्या माणसालाही सश्रद्ध बनवतात. (की अंधश्रद्ध? अर्थात, हा ज्याचा त्याचा विश्वास) देवाला न मानणारा आणि तसे मोठ्या तोंडाने सांगणारा मनुष्य जेव्हा एखादा आप्तस्वकीय आजारी असला तर देवाचे पाय धरतो, तेव्हा नेमके त्याचे काय होत असावे? मनात खोलवर अशी माणसे (अंध)श्रद्धा बाळगून असतात परंतु कदाचित प्रचीती येईपर्यंत त्याचा त्यांना सुगावा नसतो. म्हणून गोष्टीचे नाव अंधश्रद्ध. 'अंधश्रद्ध कोण?' असे नाव दिले असते तर अपराधी कौन? सारखे झाले असते असे वाटते. ही गूढकता भयकथेपेक्षा मानसशास्त्रीय कथा आहे असे मला वाटते.

प्रामाणिक मताचा राग नाहीच  उलट, मला प्रतिसादांमुळे खुलासे करण्याची, अधिक विचार करण्याची संधी मिळते.

अनु,

रिमाच्या मृत्यूचा थेट संबंध जर रोखलेल्या नजरेशी जोडला असता

रीमाच्या मृत्यूचा संबंध ट्रकच्या हेडलाईटसशीच आहे कारण अंधारात ते तिचा पाठलाग करत आहेत. त्याबद्दल फार खोलात लिहीले असते तर तिचा मृत्यू झाला आहे हे आधीच लक्षात आले असते असे मला वाटले. पण पुन्हा एखादे अधिक वाक्य टाकायला हरकत नाहीसे वाटते. करता येईल.  

विटेकर,

अनुदिनी म्हणजे ब्लॉग हे अनुताईंनी सांगितलेच. हा माझा ब्लॉग. यावर कालच ही गोष्ट टाकली होती.