समोरच्या व्यक्तिबद्दल काडीमात्र माहिती नसताना तिला उद्देश देणे, याला काय म्हणायचे ते कठीण आहे. एकाधी व्यक्ती बेळगावच्या मराठी लोकांच्या बाजूने मत मांडते म्हणजे ति व्यक्ति बेळगाव सोडुन कुठे गेली नाहिच असा अर्थ लावण्याचे आश्चर्य वाटते. तुम्ही गुजरात आणि पुणे सोडुन कुठे कुठे गेलात ते कळवा मला, आणि मी पण किती राज्यात आणि देशात राहिलो आहे ते सांगतो. नंतर कळेलच कोण जास्त जग फिरले आहे. तुमच्या बोलण्यात स्वत:च्या मोठेपणाविषयी जागोजागी अहंकार दिसतो, त्याचेच जास्त वाइट वाटते.
"माझ्यामते आम्ही बेळगाव या विषयावर चर्चा करत आहे, त्यामुळे बेळगावचाच विचार करायला पाहिजे." "नंदुरबार किंवा माटुंगा मद्ये बेळगावशी तुलना करण्यासारखी एक तरी गोष्ट आहे का?"
हि माझी वरची दोन वाक्य तुमच्या दोन वेगवेगळ्या मुद्याना उद्देशुन आहेत. तुम्हीच लिहलं होतं की मी फक्त बेळगावचाच विचार करतो. आता प्रश्न बेळगावचा आहे, मग आणखी दुसरा कोणता विचार करायचा??
नंदुरबार किंवा माटुंगा तुलना करण्यास माझी कांहीच हरकत नाही. मि फक्त एकच प्रश्न विचारतो कि, तुलना करण्यासाठी त्या शहरामध्ये काय साम्य आहे? तुमची कारणे फक्त "जर तर" अशा गोष्टीवर होती. तशी जर तर ची कारणे कुठल्याही गोष्टीना देता येतात. उदा: पुण्याचे सुरेश कलमाडी हे कर्नाटक मधुन आले आहेत. त्याची पुण्यावर पकड आहे (होती). त्यानी जर पुणे कर्नाटकात विलीण करायचा प्रस्ताव आणला तर?? असे बरेच कांही लिहिता येइल.
वाचूनही न कळल्यासारखे करु नका. जर वरील शब्दात सांगितलेलेही आपणास नाही कळले तर आपणास साष्टांग प्रणिपात व आपल्यासमोर शरणागती.
फक्त दुसर्याने आपले ऐकावे हिच इछा दिसते तुमची. कधी दुसर्याचेही विचार समजावुन घेण्याचा प्रयत्न करा.
असो. मराठी विकिपीडियावर बेळगांव हा लेख या महिन्याचे मुखपृष्ठ सदर आहे. तेथे भेट द्या, जमल्यास तेथे (अजून) योगदान द्या. पुढील महिन्याचे सदर क्रिकेट विश्वचषक स्पर्धा, २००७ हा लेखही उत्तम जमतो आहे. त्यालाही भेट देउन तो सजवा.
तुमच्या विकिपिडियाच्या योगदानाबद्दल मला शंका नाही. ते काम सुरु ठेवा, पण तुम्हाला जे पटत नाही ते चुकीचेच आहे असा गैरसमज करुन घेत जावु नका.
येथे वाळक्या गप्पा मारुन कोणाचेही मतांतर झालेले नाही.
मला माहीत नव्हतं कि तुम्ही इथे सगळ्यांचं मतांतर करण्यासाठी लिहीत होता. शिवाय ह्या चर्चेत बरेच लोक सहभागी आहेत, त्यांच्या मताविषयी बोलणे म्हणजे जरा अगाऊपणा वाटत नाही तुम्हाला?? स्वताचे विचार हे अम्रुताचे बोल, दुसर्याचे विचार म्हणजे वाळक्या गप्पा. वा ! . माझ्यामते "मनोगत" वाल्यानी हे वाळक्या गप्पांचे ठिकाण बंद केलेले बरे !
मला कटु बोलायची इछा नाही, पण माझी मते स्पष्टपणे मांडण्यात मी मागेपुढे पाहणार नाही.
गोपाळ