आता कुठे जरासे माझे लिहून झाले
आता कुठे जरासे शब्दांत प्राण आले

ठीक. ह्या मतल्यामुळे आता कुठे जरासे हे पुढच्या प्रत्येक सानी मिसऱ्यात यायला हवे असे इथेच कुठेतरी वाचले होते.

तोडू नकोस नाती, सोडू नकोस माती
दूरस्थ दु:खितांचे सल्ले मला मिळाले

चांगला आहे.

विश्वास जिंकण्याचा त्यांनी ठराव केला
जे जे म्हणाल तुम्ही ते ते करू म्हणाले

स्पष्ट होत नाही.

आरोप ऐकताना तो आपसूक मेला
आडून बोलणारे मारेकरी निघाले

स्पष्ट होतो पण अगदी नेहमीचा शेर. वेगळेपणा शून्य.

कंपूत पांढर्‍यांच्या का एकजूट नाही?
बदके इथे उडाली, बगळे तिथे उडाले!

दोन्ही ओळी चांगल्या आहेत पण शेर आणखी चांगला व्हायला हवा बुवा.