चार ओळ्यांच आयुष्य फक्त
चार ओळींतच असत दडलेलं.............
त्यातून तेच व्यक्त होत
जे प्रत्यक्षात असतं घडलेलं...
चार ओळींतून व्यक्त करताना,
मनाच्या भावना कंठ माझा दाटतो...........
म्हणूनच चारोळ्यांच्या रुपाने
हा "प्रेमस्पर्श" मी सर्वांना वाटतो..........
-: रवि विश्वासराव (कवि)
*कवि रवि विश्वासराव यांच्या "प्रेमस्पर्श" या चारोळी संग्रहातून साभार.