ह्या लिखाणाने काही संदेश देण्याचा हेतू नाही. ही गोष्ट आहे एका सर्वसामान्य पांढरपेशा माणसाची. त्याला एक न्यूनगंड आहे. की तो त्याच्या, त्याच्यापेक्षा सुंदर असलेल्या बायकोचं संरक्षण करण्यास असमर्थ आहे. आणि त्यातूनच त्याच्या मनात रिक्षावाल्याची काल्पनिक भीती निर्माण झाली आहे. त्याचा न्यूनगंड आणि ही काल्पनिक भीती ह्यांचं पर्यवसान अखेरीस त्याच्या वेडं होण्यात होतं. अख्खं नाटक इथे लिहिणं शक्य नव्हतं आणि तेवढं वाचणं वाचकांनादेखील शक्य झालं नसतं, म्हणून शेवटचा प्रवेश अनुभव रूपात लिहिला आहे. अर्थात नाटकाची नशा काय असते हे सांगायचा हेतू मात्र होता.