नमस्कार,

               जय महाराष्ट्र!

                                               आरक्षण का असू नये.इथे मनोगतावर काहीजण आहेत ज्यांचा आरक्षणाला विरोध आहे.त्यांच्या विविध प्रतिसादामधून ते दिसून आले आहे.म्हणुनच ही चर्चा.  आरक्षण घटनेने दिलेला अधिकार आहे. भारत हा देश जातीपातीत विभागलेला आहे. प्रत्येक मागास वर्गाचा विकास होण्यासाठी आरक्षण काढले गेलेले आहे. सरकारी नोकऱ्यांत आणि शैक्षणिक संस्थात आरक्षण लागू आहे. मागास वर्गातील(एससी. आणि एसटी) ५९ जाती आहेत. विमुक्त जाती १४ आहेत. इ.मा.व.(ओ.बी‌‌.सी.) ३३२ जाती आहेत. विशेष मागास प्रवर्गात ४२ जाती आहेत. यातही अनेक प्रकार आहेत.त्यानुसार जातींची संख्या वाढते. या सर्व जातींना आरक्षण लागू आहे. त्यातले काहीजण आरक्षणाचा लाभ घेत असतील तर काही जण नाही. या सर्व जाती समूहांचा विकास झाला आहे का? आपणास काय वाटते.  एकादोघांचा विकास पाहून समाज सुधारला आहे आता आरक्षणाची गरज नाही असे आपणास वाटते का?

  आपण कोणते निकष लावून आरक्षणाला विरोध करतो ?

आपला

कॉ.विकि