ओले काजू व्यवस्थित वाळवले तर महिनाभर टिकू शकतात. फक्त वापरायच्या आधी तास-दोन तास ते पाण्यात भिजत घालून पुढची प्रक्रिया करावी.

आपण नेहमी वापरतो ते काजू भाजलेले असतात. त्यामुळे त्यात काही रासायनिक बदल झालेले असतात. ओले शेंगांतील दाणे वापरण्याऐवजी भिजवलेले भाजलेले दाणे वापरले तर चव  निश्चितच वेगळी लागते.  तरीही भाजलेले काजू भिजत घालून त्याची उसळ करता येते असे काही जणांचे मत आहे. स्वप्रयोग हाच अंतिम शब्द ठरवलेला बरा.