हीच चर्चा आपल्याला भारत देश ही एक फसलेली गोष्ट आहे. आपण मारे कितीही नगारे वाजवले तरी भारतीय म्हणजे नेमके कोण? ( अथवा पाकिस्तानी/अमेरिकन/ब्रिटिश) म्हणजे तरी नेमके काय? जी बोंब भारतीयांची तीच चिन्यांची!

अवघे विश्वची माझे घर वगैरे.....

अशी करता येईल का? काय फरक आहे भारतीय व पाकिस्तान्यांमध्ये? किंवा इराकी आणि अमेरिकनांमध्ये? शेवटी सगळीच माणसे ना?

नाही, असे निश्चित म्हणता येणार नाही.त्यासाठी आपल्याला "राष्ट्र" ही संकल्पना समजाऊन घ्यायला हवी. राष्ट्र म्हणजे केवळ एखादा भूभाग/ भूप्रदेश नव्हे तर चिरंतन , शाश्वत मूल्यावर आधारलेली एक जीवंत संस्कृती! अशी मूल्ये असणारे कीती देश जगाच्या पाठीवर आहेत?

आपली आणि पाकीस्तानची श्रद्धामूल्ये काल-परवा पर्यंत एकच होती.इतर राष्ट्रांबाबत असे म्हणता येईल का? इराक वरती कार्पेट बाँबिंग करणाऱ्या अमेरिकेची आणि कधीही कुणावरही आक्रमण न केलेल्या भारतीयांची मूल्ये एकच म्हणता येतील का?

'अवघे विश्वची माझे घर'अथवा 'सर्वेपि सुखिनं संतु'  हे भारतीयांच्या विशाल /सर्वसमावेशक संस्कृतीचे द्योतक आहे. इतरांना तिथे पोचण्यास काही शतके जावी लागतील. ( हा अभिनिवेष नव्हे , केवळ परीस्थितीचे वास्तवदर्शी आकलन आहे)

आणि माणसेच का, आम्ही तर चराचरात परमेश्वर पाहीला आहे, त्यावर आमचा विश्वास आहे, आणि हा विश्वास सिद्ध करण्यासाठी आम्हाला आमचे क्षुल्लक भेद विसरून अध्यात्मिक सुपर पॉवर व्हायला हवे, यातच जगाचे कल्याण आहे!