नेहमी फ़क्त मुलाच किंवा त्याच्याच आई-वडिलांचाच विचार केला जातो. घरात सासू-सुनांमध्ये वाद झाला तरी दोशही सुनेलाच दिला जतो.  फ़क्त मुलांच्याच आई-वडिलांना त्यांना मोठ करण्यासाठी कष्ट करावे लागतात.मुलींना मोठ करण्यासाठी त्यांच्या आई-वडिलांना अपल्या सरकारकडुन दर महिन्याला  पैसे  पुरविले जातात.त्यामुले त्यांन अजिबात कष्ट करावे लागत नाहित.

अपल्याकडे मुलगा-सुनेने आई-वडिलांपासुन वेगळं राहणे हा फ़ार मोठा गुन्हा समजला जातो‍. जरी का मुलगा त्याच्या सासु-सासर्यांशी दहा मिनीटेही फोनवर बोलु शकत नसेल,बायकोच्या माहेरच्या कार्यक्रमात एक दिवस पण थांबु शकत नसेल तरीही  त्याला कोणीही दोश देणार नाही.पण मुलीने तिचे तिचे संपुर्ण आयुष्य सासरच्याच लोकांसाठी खर्च केले पाहीजे असा अलिखित नियमच आहे.

आणि शेवटी एकत्र राहिले तरच प्रेम असते असे काही नाही. लांब राहुनही काळजी घेता येते.