उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रश्चैव दक्षिणम / वर्षं तद भारतं नाम भारती यत्र संतति:

या वाक्यामधील अभिप्रेत प्रदेशाला भारत म्हणतात हे ठीक आहे. मात्र हा प्रदेश हे एक राष्ट्र किंवा एक देश किंवा एक राज्य किंवा एक खंड यापैकी नक्की काय आहे हे स्पष्ट केलेले नाही. याला राष्ट्र मानण्यास आपण सुरुवात केली ती स्वातंत्र्यानंतरच.

केवळ स्वातंत्र्यपूर्व काळातच नव्हे तर स्वातंत्र्योत्तर काळातही भारत हा काही अपवाद (उदा. क्रिकेट सामने वगैरे) वगळता एकसंध देश म्हणून कधीच उभा राहिलेला नाही हे स्पष्ट दिसत आहे. उत्तर भारतीयांना दक्षिण भारतात ( भय्या साले!) व दक्षिण भारतीयांना उत्तर भारतात (साला मद्रासी!) मिळणारी वागणूक ही सन्मानाची मिळते का? ईशान्य भारतातील लोकांना ईशान्येतर भारतीय आपल्यापैकी एक समजतात का?