निनाद - जगात व्यक्ती तितक्या प्रकृती! - यामध्ये फक्त मुलींनाच दोष देण्यात अर्थ नाही.
माझ्याही पाहण्यात अशी कुटुंबे आहेत की लांब राहून ते महत्त्वाच्या वेळी एकत्र येतात, सुखाच्या आणि दुःखाच्या वेळीसुद्धा! सासू हॉस्पिटलात आहे, आणि दोन्ही मुले, सुना, मुलगी, जावई - आपल्या वेळा वाटून घेऊन सासूची काळजी घेतात - याने समाधान वाटते, मग एरवी असेनात का प्रत्येक जण आपापल्या घरी.
अशी घरेही मी पाहिली आहेत तिथे सून किंवा मुलगा खूपच आक्रस्ताळेपणा करतात, एकत्र राहूनही महिनोंमहिने एकमेकांशी बोलत नाहीत अशा वेळेस काय उपयोग आहे एकत्र राहण्याचा? तेव्हा त्यांच्या आईवडलांचे हाल पाहवत नाही. अशा वेळेस आईवडलांचे पॉझिटिव्ह राहून आयुष्याचा आनंद घेणे आवश्यक आहे असे वाटते. (यावर मागे माधव कुलकर्णी यांनी छान कथा लिहिली होती - बहुदा वृद्धाश्रम नावाची.)
अगदी दोन माणसांच्या संसारात सुद्धा तडजोड लागतेच. प्रयत्न, आपुलकी, प्रेम दोन्हीकडून असायला हवे तरच ते टिकेल.