सुमीतना माझे विचार पटले. केवाकाना आपण स्वतः भ्रटाचारी आहोत हे कबूल करवत नाही. या वरून मी भ्रष्टाचरी असलो तरी "दुसऱ्याने भ्रटाचार करू नये" असे आपल्या सर्वानाच वाटते हे सिद्ध होते. भ्रष्टाचार नसावा यावर एकमत आहे. मग तो संपवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. मला सुचलेला मार्ग मी कडीमध्ये दिला आहे. आपल्या सर्वानाही कांही मार्ग सुचत असेलच. मार्ग सुचवल्यामुळे भ्रष्टाचर नाहिसा होणार नाही त्या करता कृती आवश्यक आहे हे ही मला माहित आहे. परंतु, कोठलीही कृती करण्याअगोदर विचार करणे सुद्धा आवश्यक आहे. आपण विचार करु या कांही तरी मार्ग निघेलच.

मी प्रत्यक्ष प्रयोग केलेला सांगतो. माझ्या गाडीचे रजिस्ट्रेशन जलपायगुडी पश्चिम बंगालचे होते. ते पुण्यात करण्याकरता प्रादेशिक कार्यालयात गेलो. पुष्कळ लोकानी सांगितले एजंटला थोडे जास्त पैसे द्या घरबसल्या काम होईल. परंतु, मला कोणालाही लाच न देता काम करुन घ्यावयाचे होते. मला ३/४ चकरा मारावयास लागल्या, वेळ लागला, परंतु एकही जादा पैसा द्यावा लागला नाही. थोडे कष्ट करण्याची व वाट पाहण्याची तयारी असेल तर विनालाच काम होऊ शकते.

सर्वानी निदान विचार मांडावेत. मार्ग निघेल.