प्रशासनाने माझीच वाक्ये दोन दोनदा उद्धृत करून धमाल उडवली आहे तेव्हा वेळ मिळाला म्हणून मूळ प्रतिसादात भर घालते.

स्त्रीमुक्तीचा मक्ता घेतल्याच्या आविर्भावात प्रतिसाद लिहिणाऱ्या स्त्रीवर्गाने 'पुरुषाचे लक्ष वेधून घेणे हे साजशृंगाराचे मूळ उद्दिष्ट आहे' या वाक्याचे खंडन करावे!

एखाद्याने स्त्रीमुक्तीचा मक्ता घेतला आहे असा ग्रह करणे नक्की कोणत्या चष्म्याने होते? असो. स्त्रीवर्ग जेव्हा साजशृंगार करतो तेव्हा समोरच्या अनोळखी पुरुषाने अंगचटीला यावे, आचकट विचकट शब्द वापरावेत असे त्यांना मनापासून वाटत असते असे तर नाही सुचवायचे आपल्याला?

द्रौपदीला श्रीकृष्ण 'सखी' या नावाने संबोधित असे (असा बेमिसाल या चित्रपटात उल्लेख आहे - ते चुकीचे असल्यास क्षमस्व - त्यावरुन वेगळा वाद नको!) सखी म्हणजे मैत्रीण.

उल्लेख बरोबर आहे. चित्रपटात अमिताभ राखीला सखी म्हणतो परंतु काही विद्वानांच्या मते द्रौपदीला श्रीकृष्णाबद्दल अतीव आकर्षण होते असे सांगितले जाते. युगंधरमध्ये असे सूचित करणारे संवाद आहेत. (ते चुकीचे असल्यास क्षमस्व - त्यावरुन वेगळा वाद नको!)

हे पुरुष आहेत आणि त्यांनी लिहिलेला लेख हा पुरुषाने लिहिल्यासारखाच वाटणार! पुरुष हा मनुष्य नसतो काय?

पुरुष हा मनुष्यच असतो पण प्रत्येक मनुष्य पुरुष नसतो इतके साधे गणित आहे. या लेखात मानवी भावापेक्षा पुरुषी भाव अधिक दिसले इतकेच सांगायचे होते.

आपल्याशी लडिवाळपणा करणारा प्रत्येक पुरुष आपल्याकडून शरीरसुखाची अपेक्षा करतो आहे असे विचार नक्कीच स्त्रीच्या मनात येत नाहीत, बहुधा घृणा, किळस असे भाव आधी येत असावेत असे वाटते.

बाकी, प्रशासनाची अद्यापही कमाल वाटते.