पूर्णविराम देऊ नका.
लिहीत राहा.
लिखाण, मग ते कथा असो वा लेख वा कविता, त्याचा शेवट हे एखादे 'कंक्ल्युडिंग' वाक्य असावे असे वाटते. (एखाद्या कथेला प्रत्यक्षात शेवट नसेल तरी त्याचा कागदावर शेवट करताना 'हे असे चालतच राहणार..' वा तत्सम सूचक वाक्य असावे असेही वाटते.) वाचकाला 'अरे, कथा संपली की मासिकाचे यापुढचे पान हरवले' असा प्रश्न पडू नये अशाप्रकारे सुस्पष्ट शेवट असावा.

बऱ्याचदा आपण दैनंदिन जीवनात घडलेल्या गोष्टी लिहितो त्यांचा हिंदी चित्रपटांप्रमाणे 'अमक्याच्या बापाला गोळी लागली, तमकीला पश्चात्ताप झाला आणि तिने त्या दोघांचे लग्न लावून दिले आणि ते दोघे सुखाने नांदू लागले. समाप्त.' असा सुस्पष्ट शेवट करणे कठीण असते हेही तितकेच खरे. नीटसा शेवट नसलेल्या, किंवा प्रत्येक भागात एखादा प्रसंग घेऊन त्या अनुषंगाने कथा सांगत राहणाऱ्या अनेक सुंदर हिंदी/इंग्रजी मालिकाही गाजल्या. उदा फ्लॉप शो, देख भाई देख, फ़्रेंड्स, लॉरेल हार्डी, आय ड्रीम ऑफ जिनी, डेनिस, जबान संभालके इ.इ.

आपली ही मजेशीर आणि अनेक अपघातांतून/योगायोगांतून विनोद निर्माण करणारी कथा अशीच एखादी मालिका आहे असे समजायला हरकत नाही. लिहीत राहावे. आपल्याला पहिल्याच लिखाणात लोकांना बऱ्यापैकी हसवण्याची कला साधलेली आहेच. लिहिता लिहिता हळू हळू आपला आपल्यालाच कुठे वाढवावे कुठे काटावे हा अंदाज चांगला येऊन लिखाणाची नस गवसते. (मला ती गवसली आहे असा माझा दावा अजिबात नाही! बरेच इतरांचे चांगले लेख/इतरांचे कथा चांगली पण नीट फुलवता न आलेले लेख/स्वत:चे कमी पडलेले लेख वाचताना जे मुद्दे जाणवले ते सांगितले इतकेच..)
(प्रवचनकार)अनु