कृपया लक्षात घ्या की खुलासा दिलेला नाही. मी हरकतीच्या काही मुद्द्यांविषयी माझे मत दिले आहे. (विषयांतर: फारा वर्षांपूर्वी एका चित्रपट विषयक प्रकाशनात मी कै. ओ.पी. नय्यर यांची एका मुलाखत वाचली होती, त्यातील त्यांचे एक वाक्य मला प्रभावित करुन गेले, ते असे - " खुलासा मी कधीच देत नाही कारण मला ठाऊक आहे की माझ्या हितचिंतकांना त्याची गरज नाही आणि माझे विरोधक त्यावर विश्वास ठेवणार नाहीत. मग आपले शब्द का वाया घालवा?"). हे मत हाच जर आपल्याला खुलासा वाटत असेल तर हरकत नाही.
श्री. अत्त्यानंद याचा मुद्दा रास्त आहे. वास्तविकपणे काय हे अधिक महत्त्वाचे, पण प्रत्यक्षात कोण यालाच महत्त्व दिले जाते. असे का?
डॉ. साती यांचा मुद्दाही योग्यच आहे. व्यक्तिमत्त्व आणि सौंदर्य यात निश्चित फरक आहे पण संबंधित विषया बाबत हे समांतर आहे. करारी मुद्रेच्या, भेदक नजरेच्या, खड्या आवाजात बोलणाऱ्या स्त्रीचे व्यक्तिमत्त्व शिक्षिका वा प्राध्यापिका म्हणून उत्तम ठरेल पण विमान कंपन्या अशा व्यक्तिमत्त्वाला उड्डाण-कर्मचारी(प्रवासी सेवा विभाग) म्हणून घेतील का? निश्चितच नाही!
जाता जाता: एक विनंती - कृपया मतभिन्नतेबद्दल क्षमस्व वगरे लिहू नका. जर द्वेषाधिष्ठीत नसेल तर मतभिन्नता हे जीवंतपणाचे लक्षण आहे असे मी मानतो.