लेख वाचल्यावर १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांपासून ते भगतसिंगापर्यंत सर्वांचे आत्मे तळमळले असतील - हाच का तो (आपल्या आठवणी कृतज्ञतेने जागृक ठेवणारा) सर्वसाक्षी? असे त्यांना वाटू शकेल...
नामदेवराव; १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाचा व त्यांच्या वीरांवर लिहिलेल्या लेखाचा येथे काय संबंध ?
सर्वसाक्षींचे कित्येक लेख हे नुसते वाचनीयच नव्हे तर त्यावर विचार करण्यालायक असे आहेत हे वेगळे सांगायला लागू नये. ह्या एका लेखातले त्यांचे विचार तुम्हांस किंवा इतर बुद्धीवाद्यांना पटले नसतील तर नक्कीच त्यावर मत प्रदर्शित करण्याचा हक्क आपणांस आहे (व तो आपण बजावताही आहात)
कुठल्याही लेखकाचे जे त्यांचे चांगले लेख आहेत त्यावर तेथे जाऊन साधक बाधक प्रतिक्रिया देण्याऐवजी त्यांचा बदरायणी संबंध दुसरीकडे जोडून सरसकट लेखकाला झोडपायला घेतल्याची जाणीव असल्या प्रतिसादांतून होते.
आपल्या ह्या प्रतिसादातील पहिल्याच वाक्याने आपण लेखनाला नव्हे तर लेखकाला (व्यक्तीला) विरोध करीत असल्याची स्पष्ट कल्पना आपला प्रतिसाद वाचून होतेय. इतकेच नव्हे तर १८५७ च्या लेखांचा संदर्भ येथे आणून आपण त्या उत्कृष्ट लेखमालेच्या लेखकावर कुठल्यातरी अज्ञात कारणाने डूख धरून ठेवल्याचा संशयही येतोय.
इतरांनीही कृपया लेखातल्या विचारांबद्दल किंवा लेखनाबद्दल मत मांडावे. लेखनकर्त्या व्यक्तींवर वा त्यांच्या इतर लेखांवर ताशेरे उडवण्याचा खोडसाळ पणा आता जुना झालाय !