आपल्या मताबद्दल धन्यवाद.
श्री. अत्त्यानंद याचा मुद्दा रास्त आहे. वास्तविकपणे काय हे अधिक महत्त्वाचे, पण प्रत्यक्षात कोण यालाच महत्त्व दिले जाते. असे का?
कारण सोपे आहे. जो मनुष्य. येथे पु. ल. म्हणाले, ते प्रसिद्ध व्यक्ती होते. अशी वाक्ये पु. ल. च का अमिताभ, शाहरुखही म्हणू शकतात कारण त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यात ते आल्यागेल्या कोणत्याही बायकांबरोबर छचोरपणा करत होते हे दिसत नाही, त्यांचे बरेचसे व्यक्तिगत आयुष्य हे खुले असते आणि पु. लं. च्या स्वभावविशेषाबद्दल इतके माहित असताना ते जाणूनबुजून असे गैर काही म्हणतील असे त्या नटीला वाटले नसेल. (बरेचदा असेही होते की माणसाचा हुद्दा, समाजातील प्रतिष्ठा यांना पाहून ही माणसे असे काही म्हणाली तरी चालवून घ्यावे लागते.)
वाक्य कोण म्हणाले हे महत्त्वाचे का- असे वाक्य आपल्याला परिचित मनुष्य जसे, नवरा, प्रियकर किंवा अगदी खेळकरपणे एखादा मित्र म्हणाला तरी चालते. म्हणूनच मी अत्यानंदांना विचारले की घरगडी म्हणाला तर चालेल का? "ये मी तुला उचलतो" हे वाक्य नवरा म्हणाला तर बाईला काही वाटायचे नाही. भाऊ कॅज्युअली म्हणाला तरी वाटायचे नाही परंतु दिर कॅज्युअली म्हणाला तर वाटणारच नाही असे मानता येईल का? तेव्हा कोण म्हणाले हे ही तितकेच महत्त्वाचे. याहून अधिक स्पष्टीकरण द्यावेसे वाटत नाही.
त्यामुळे अत्यानंदांचा मुद्दा मला अजीबात पटलेला नाही.
सातीचा मुद्दाही नाही. विशेषतः बाईने तो म्हणावा असा तर नाहीच पण हे झाले माझे मत. तिचे ते असावे.
"हवाईसुंदरी " या शब्दातच तिने आकर्शक दिसावं, छान बोलावं हे अपेक्षित असतं.
आकर्षक दिसणे आणि छान बोलणे म्हणजे सुंदर दिसणे आणि लडिवाळ बोलणे नक्कीच नाही. हवाईसुंदरी हा शब्दही मला मान्य नाही. इंडियन एअरलाईन्सच्या महिला आपल्याला आवडत नाहीत कारण त्या सेवा देत नाहीत, उद्धट वागतात किंवा काही तसे असते तर ठीक, (तसे आमच्या शारीरीक शिक्षणाचे शिक्षक आमच्याशी उद्धट वागल्याचे किंवा काही न शिकवता गेल्याचे आठवत नाही.) परंतु त्या छबकड्या दिसत नाहीत म्हणून त्या आवडत नाहीत? अमेरिकेतील विमानातील फ्लाईट अटेंडंटही छबकड्या दिसत नाहीत कारण त्या सुंदऱ्या नसतात, सेविका असतात.
असो. आपण म्हणाला ते खरे, परंतु मी आपली विरोधक नाही, किंवा विरोधी मुद्दा मांडला म्हणून हितचिंतक नाही असेही नाही आणि हितचिंतक आहे असेही नाही. येथे मी फक्त वाचक आहे आणि आपल्या वाचनाची चाहती आहे, हे पटवून देण्याची गरज वाटत नाही. आपल्या विषयी द्वेषाधिष्ठित काही असण्याचे कारणही नाही, उलट आदरच असावा म्हणूनच जे खटकले त्याबद्दल माझी मते मांडली. ती पटावीत असाही आग्रह नाही. परंतु मते पटली नाहीत म्हणून एखाद्याने उठून (येथे लेखकाने नाही) तुम्हाला स्त्रीमुक्तीवादी, विकृत किंवा स्वतः डॉक्टर नसतानाही मानसोपचारतज्ज्ञांकडे जा असे तारे तोडल्याने उद्वेग येतो आणि क्षमा मागून गप्प बसावे असेच वाटत आले आहे.
असो. बरेचसे स्पष्टीकरण दिलेले आहे त्यामुळे हे सर्व आता मी माझ्याकडून थांबवत आहे.