आनंदकंदात तारापराधिकागा म्हणजेच गागालगालगागा एवढी सात अक्षरे घेऊन ग़ज़ला लिहिल्या ज़ातात. त्यात पुनरावृत्ती नसते आणि तरी ते कानाला खटकत नाही असे वाटते. उदा०
आनंदकंद गागालगालगागा गागालगालगागा (२४ मात्रा) असे होते असे वाटते. तुम्ही दिलेल्या उदाहरणांत ते अर्धेच (१२ मात्रा) वापरलेले वाटते. मी ऐकलेली आनंदकंदाची काही उदाहरणे -
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
किंवा
डोळ्यावरून माझ्या उतरून रात्र गेली
वचने मला दिलेली विसरून रात्र गेली
चू. भू. द्या. घ्या.
'आहेच की' वरून आठवले....
तीच अक्षरे त्याच ठिकाणी आल्याने तसे मलाही वाचल्यावाचल्या वाटून गेले होते.