सर्वसाक्षी, तुम्ही जे लिहीले होते त्याप्रकारच्या वागण्याला (तुमच्या नाही) "कॅज्युअल" म्हटले आहे (कॅज्युअल = जास्त विचार न करता - कृपया वाचले नसल्यास वरील स्पष्टीकरण वाचावे), बदफैली नाही.   असभ्य, बदफैली वगैरे तुमचे शब्द आहेत, मी ते वापरले नाहीत आणि मनातही नव्हते. ह्याला " सरळ सरळ " म्हणणे ही तुमची निवड झाली.  शिवाय तो माझा पहिला  प्रतिसाद होता,  तो प्रतिसाद बघून असे वाटले असते तर पहिल्याने मी ते वाक्य लिहीले तेव्हाच बोलला असतात.  ही सर्व तुमची पश्चातबुद्धी असावी असे वाटते.   जे काही कचेरीतील स्त्रियांबद्दल (तुमच्या नव्हे) बोलले ते तुमच्यावर रोखाने नाही, हे स्पष्ट करूनही आपण अजून त्याच पालुपदाला चिकटून आहात याचे सखेद आश्चर्य वाटते.   तसेच मला साळसूद वगैरे म्हणून तुमचे समाधान होणार असेल तर जरूर म्हणा. आत्तापर्यंत एका लेखावर आपले मत सभ्यपणे मांडल्यानंतर "साळसूद, सौजन्याचे मुखवटे पांघरणे, मनात विष असणे, अवमानकारक, दुखावणारे बोलणे" इत्यादी अनेक प्रकारे माझा  उद्धार झाला आहे, हे मला वाटते येथील प्रशासनाला चालते. असो. 

परत एकदा शेवटचे - वैयक्तिक आयुष्यात कोणी काय कसे वागावे हे मी सांगत नाही आणि माझा त्याच्याशी संबंध नाही.  मला फक्त तुम्हाला तुमच्या लिखाणाबद्दल जमल्यास जागरूक करायचे होते.  मी तुम्हाला तुमच्या लिखाणामधून जे काही समजले आहे त्यामुळे माझ्यापेक्षा वयाने लहानही समजते, त्यामुळेही अशी बुद्धी झाली असेल. पण हे लक्षात आले आहे की त्याची काही गरज नव्हती. त्यामध्ये मी कोणावरही व्यक्तिगत कसलेही आरोप केले नाहीत, आणि तसे दुरान्वयानेही दाखवायचे नव्हते परंतु तसे वाटत असल्यास त्याला मी काही करू शकत नाही.   आता हा वाद थांबवावा ही मात्र नम्र विनंती.  

सुहासिनी