देण्याचा विचार जवळजवळ पूर्ण केला आणि पुनर्विचाराला प्रवृत्त करणारे काही संदेश आले. परत लिहायला सुरुवात करावी असे वाटते आहे, पण अचानक हातातल्या कामांत बेसुमार वाढ झाली (आधीचे भाग लिहिताना मी स्वयंघोषित 'बाका'वर होतो) आणि परत मांडी ठोकून बसणे सध्या तरी खूपच अवघड झाले आहे.

एक चांगला परिणाम - दिवसाला एक या गतीने पुढचा भाग लिहायचा असा तणाव कुठेतरी सुप्त अवस्थेत का होईना, जाणवत होता. गेले दोन दिवस मनोगत बघण्यापुरतादेखील वेळ न झाल्याने थोडा 'अलिप्त' होण्याचा प्रयत्न करू लागलो आहे. त्यामुळे दूरदर्शनवरील धारावाहिकांप्रमाणे "पाणी घालून वाढवण्याचा" प्रकार आता टाळता येईल असा थोडा विश्वास वाटतो आहे.

तर, प्रयत्न पुन्हा जरूर करेन, पण आता दोन भागांतले अंतर बऱ्यापैकी वाढेल.

आणि या 'धारावाहिका'चा शेवट आत्ताच सांगून ठेवतो - उण्यापुऱ्या २४ तासांची ही कहाणी. त्यामुळे ज्या दिवसाचे वर्णन चालू आहे त्या संध्याकाळी हिचा शेवट होईल हे नक्की!

प्रतिसादांबद्दल पुनश्च धन्यवाद.