आज सात वर्षांनी , ही सावली दूर गेल्यानंतर , त्यांच्या मृत्यूनंतर आलेल्या त्यांच्या प्रेमाच्या पुराची लाट किंचितशी ओसरल्यासारखी झाल्यानंतर
हेच खरे आहे. पु. लं. च्या मोठेपणाविषयी वाद नाही, पण काळ कुणासाठी थांबत नाही हेही खरे. पु. लं. च्या श्रद्धा, त्यांची आयुष्यविषयक तत्त्वे आता हळूहळू पुसट होत गेली तर जबरदस्तीने ती अधोरेखित करण्याचा कुणी अट्टाहास धरु नये. बालगंधर्वांच्यावरचे पु. लं. चे प्रेम, चार्ली चॅप्लीन, वुडहाऊससारखी त्यांची श्रद्धास्थाने आता ढासळताना दिसली तर त्यासाठी पु. लं. ना किंवा आजच्या पिढीला वगैरे जबाबदार धरु नये. एका वाहून गेलेल्या काळाचे साक्षीदार पु. लं! त्यांच्याबरोबर तो काळही संपला. आता पुढे!