ऐहिक, तुम्ही बालगंधर्व आदिंचा उल्लेख केलात ; आणि ते बरोबरच आहे. पुलंनी पाहिलेला काळ तर संपलाच; आणि आता त्याला एक शतकही उलटून झाले आहे..

माझ्या प्रश्नांची दिशा थोडीशी तुमच्या आमच्या जगण्याशी संबंधित होती. पु. लं. च्या लिखाणातून जगण्याची काही एक पद्धती, काही मूल्ये , यांचे दर्शन घडते.  त्यांनी या तत्त्वांचा म्हणा , मूल्यांचा म्हणा , वेगळा असा उद्घोष कधी केला नाही. पण  "तुझे आहे तुजपाशी" सारख्या कृतींतून उघडउघड तर अन्य ललित लिखाणांतून प्रच्छन्नपणे त्यांच्या जगण्यबद्दलच्या दृष्टिकोनाचे दर्शन घडले आहे.

मराठी मनावर या वृत्तीचा नक्कीच प्रभाव पडत आला आहे. गेल्या काही पिढ्या याची साक्ष देतील. माझा प्रश्न असा होता, की बदलत्या काळात, पु. लं. च्या पश्चात, त्यांनी स्वीकारलेली कुठली मूल्ये टिकतील ? पु. ल. कितपत "रेलेव्हंट" वाटतील ? आणि जर का त्यांचा ठसा पुसट होत असेल तर , त्यांनी स्वीकारलेल्या जगण्याबद्दलच्या दृष्टिकोनातील कुठला भाग कालातीत होता काय ?