अहो वड्यावरचा (माझ्यावरचा) राग वांग्यावर (इसापनीतीवर) कशाला काढताय? माझंही म्हणणं आपल्यासारखंच आहे. इसापनीती आणि पुलंचं लिखाण ह्यांची तुलना होवू शकत नाही. त्यामुळे तात्पर्य शोधण्याचा प्रयत्न करू नये असं मला वाटतं. आपलं मत भिन्न असू शकेल.

समीक्षकाबद्दल म्हणाल, तर समीक्षा हे त्यांचं कामच आहे. लिहितात बिचारी पुस्तकं. मी एकही वाचल्याचं आठवून आठवूनही आठवलं नाही. पण आपण कदाचित वाचत असाल. त्यामुळे आपल्याला समीक्षेची गोडी. अर्थात आमच्यासारख्या गाढवांना समिक्षेरूपी गुळाची चव काय ती असणार?

आम्हाला कलाकृती आवडते. तिचा रेलेव्हन्स तपासून बघण्यापेक्षा ती कलाकृती आम्हाला किती भावली ह्याचाच आम्ही विचार करतो. कदाचित आपण फक्त रिलेव्हंट कलाकृतीच अभ्यासत असाल त्यामुळे आपली मतभिन्नता झाली असावी. असो.