मुक्तसुनीत, सध्या एकूणच जीवनविषयक मूल्ये इतक्या झपाट्याने बदलत आहेत की पु. लं. चा दृष्टीकोन काहीजणांना फारच मागासलेला वाटू शकतो. मी एक वेगळा मुद्दा यानिमित्ताने मांडू इच्छिते. पु. लं. च्या सर्वप्रकारच्या साहित्यातील भाषासुद्धा मराठी मातृभाषा असणाऱ्या नव्या पिढीला समजेनाशी झाली आहे. जर ती भाषाच त्यांच्यासाठी अनाकलनीय असेल तर त्यातून प्रकट होणारी मूल्ये कळणार कशी? आणि त्यावर विचार तरी कसा होणार? त्यामुळे तुम्ही म्हणताय तो ' रेलेव्हन्स' दुर्दैवाने मुळातूनच तपासायची वेळ आता आली आहे.