सुनील आणि प्रवासी,
संतांच्या शिकवणुकीकडे पाहण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टिकोन पुन्हा एकदा तपासायला हवा असे नाही का वाटत?
"ठेविले अनंते । तैसेची रहावे" एवढेच आपण लक्षात घेतो.
पण "चित्ती असो द्यावे समाधान" आणि "वाहिल्या उद्वेग दुख:ची केवळ । भोगणे ते फळ संचिताचे ।"
हे आपण सोयिस्कर रित्या विसरतो. येथे आपल्या कर्माला प्राधान्य आहे असे नाही का वाटत?
भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
याला व्वा करत असता पुढे ते म्हणतात
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या
तेही आपण लक्षात घेतले पाहिजे.
भूमिवर पडून ना पोटाची ना उद्याची काळजी तर भगवंताच्या नामात दंग राहावे. हीच सुखाची परमावधी त्यांच्या.
संतांनी समाजाची मानसिकता बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. विज्ञाननिष्ठ अजूनही भौतिकात आहेत आणि विज्ञानवादी नकळत टेक्नॉलोगीत अडकून समाजाला अर्थार्जनातून भोगवादाकडे नेत आहेत. अर्थात हा काव्यरसिकतेचा भाग नाही.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे स्वातंत्र्ययुद्धातील कार्य आणि नंतर समतेसाठी केलेले प्रयत्न हेही अभ्यासनिय आहेत.
संतांची स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही शिकवण तुकडोजी महाराजांनी प्रत्यक्षात आणली. म्हणून तर त्यांना राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी "राष्ट्र्संत" ही पदवी बहाल केली.