अलिकडेच अनु ह्यांनी पुलंनी भाषांतरीत केलेल्या एका पुस्तकाची ('काय वाट्टेल ते होईल!') नेमकी ओळख आपणा सर्वांना मनोगतावर करून दिली आहे. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत पु̮. ल. त्यांची जीवनाविषयीची जाण अशी मांडतातः '

"सर्वांनी एकत्र बसून जेवावे, खावे,प्यावे,क्षुद्र भेदाभेद विसरावे,आनंदात राहावे या प्रार्थनेवरच हे पुस्तक संपते. हसतखेळत, खातपीत, माणुसकीचे साधेसुधे नियम पाळीत अवघ्यांचा संसार सुखाचा व्हावा अशी इच्छा बाळगणारा जॉर्जी आपणा सर्वच सामान्य माणसांचे विचार बोलतो.दुर्दैवाने आजच्या जगातील असामान्यांना हे सामान्यांचे माणुसकीचे बोल कळत नाहीत. हा जॉर्जी मला आपला वाटला. म्हणून त्याच्या पुस्तकाचे हे मराठी रुपांतर मी केवळ मराठी जाणणाऱ्यांसाठी केले आहे."

हा भाबडा आशावाद आता कालबाह्य झाला आहे, असे म्हणायला हरकत नसावी. ''हसतखेळत, खातपीत, माणुसकीचे साधेसुधे नियम पाळीत अवघ्यांचा संसार सुखाचा व्हावा अशी इच्छा बाळगणारा जॉर्जी आपणा सर्वच सामान्य माणसांचे विचार बोलतो" हे आज कितपत खरे आहे?