या सगळ्या कृत्यांना सरसकट अविवेकी म्हणणे काही पटत नाही..

राजु शेट्टी आणि शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा मागोवा घेतल्यास "दूध रस्त्यावर ओतून देणे" या विशिष्ट घटनेला अविवेकी ठरविण्याआधी सखोल विचार करावा लागेल.

"धार्मिक भावना दुखावणे" वगैरे या घटनांमधली विकृती आणि फोलपणा मान्य आहे पण मग सर्वच घटनांचा असा एकत्रित विचार करून सर्वच समाजनेत्यांना सरसकट दोष देता येणार नाही.

वेगवेगळ्या घटनांचा त्या त्या संदर्भात विचार करायला हवा.