मुद्दा टिपणं आणि प्रश्न उपस्थित करणं वेगळं. त्या स्नेह्यांनी फक्त मुद्दा टिपला, तो असा, `यांची शेअरबाजारात काहीही गुंतवणूक नाही.' त्याआधारे तयार झालेला प्रश्न मुक्त अर्थव्यवस्थेचे जनक, शेअर बाजारात जनतेनं पैसे गुंतवावेत असं सांगणारे अर्थवेत्ते असणाऱ्या मनमोहनसिंग यांच्या एकूण दोन कोटी सतरा लाख अडुतीस हजार सहाशे शहाहत्तर रुपयांच्या रोख गुंतवणुकीतील एकही पैसा शेअरमध्ये का असू नये? हा माझ्या मनातील.
ही बाब मी माझ्या लेखनात स्पष्ट करणं आवश्यक होतं, ती न केल्याबद्दल दिलगीर आहे.