माझ्या मते हेही दिवस पालटतील. शेवटी स्वातंत्र्य, अस्मिता, जिव्हाळा या नैसर्गिक ऊर्मी आहेत आणि आज नाही तर पुढील पिढी या भाषेचे संवर्धन आणि संगोपन केल्याखेरीज राहणार नाही. उदा. भारतीय स्वातंत्र्याचा लढा हा सामान्य माणसांनी निर्माण केला आणि धसास लावला. उलट तात्कालिक संस्थानिकांची यात निष्क्रिय भूमिका होती तसेच या भाषेच्या लढ्याबाबतीत होऊ शकते.

तो पावतो आपल्याला आपले हे कर्तव्य पाळले पाहिजे.

दुसरे म्हणजे गर्दीच्या ठिकाणी म्हणजे रेल्वेस्थानकावर अथवा चौकावर अश्या बातम्या साठी एखादा वार्ताफलक जर ठेवता आला तर बरे होईल. शेवटी लोकांपर्यंत आपण जात नाही अथवा जाऊ शकत नाही हेही अमान्य करता येणार नाही.