हैदराबाद या निझामाच्या संस्थानात अभियांत्रिकि पूर्णपणे उर्दूत शिकवले जात होते त्यावेळी  उस्मानाबाद विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवीधर झालेले माझे मित्र सध्या ७८ वर्षाचे आहेत त्यानी एकदा त्यांच्या बोलण्यात सर्व तांत्रिक आणि गणितीय संज्ञांचे उर्दूकरण कसे केले होते हे आम्हाला सांगितले अर्थात उर्दूचे माझे ज्ञान `काला अक्षर भैंसबराबर` असे असल्याने मला ते कळू शकले नाही पण असा प्रयत्न करता येतो आणि तो यशस्वी होतो हे कळले,तसे ठामपणे ठरवले मात्र पाहिजे.एकाद्या गोष्टीला,वस्तूला अमुक एक नावाने संबोधायचे असे ठरवण्याची आवश्यकता आहे.उदा̮. लॅपटॉपला  पेटीगणक असे म्हणायचे असे ठरवायचे आणि ते वापरायचे.( हे फक्त उदाहरण आहे त्याहून चांगला अर्थवाहक पर्यायही कोणास सुचेल)त्यात त्या वस्तूच्या वापराचा किंवा उपयोगाचा अर्थबोध व्हायलाच हवा असा आग्रह धरायचे काय कारण ?आता आपण हत्तीला हत्ती म्हणतो त्या शब्दात काही हत्ती असा अर्थ थोडाच निघतो फक्त आपण त्याला हत्ती म्हणायचे ठरवले बस ! तशी एक समिती तयार करून त्यानी अर्थबोध होण्याचा आग्रह न धरता सुटसुटीत शब्द सुचवायचे आणि सर्वानी ते वापरायला लागायचे असे ठरवले तर आपल्या भाषेत सर्व व्यवहार करणे शक्य आहे. याबाबतीत श्री विश्वनाथ खैरे यांनी स्वत: अभियंता असून शुद्ध मराठी ( आणि अर्थवाहीसुद्धा) शब्द तयार करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे‌. तसेच प्रयत्न व्हावयास हवेत.समथांची` `केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे` ही उक्ती मात्र  प्रयत्नपूर्वक आचरली पाहिजे.