चित्रपट परीक्षण -पंतप्रधान मोदी

१९८५ नंतर जन्मलेल्या पिढीने नरेंद्र दामोदरदास मोदींच्या रूपाने उत्तम बोलणारा पंतप्रधान पहिल्यांदाच अनुभवला...! 

PM MODI हा सिनेमा तुम्हाला मोदी कसे घडत गेले हे दाखवतो.
जमेच्या बाजू-
१> मोदींचे सुरुवातीचे जीवन अत्यंत वेगाने दाखवले आहे, त्यामुळे सिनेमा रटाळ होत नाही
२> मोदी ह्या एका नावामागे किती लोकांचे परिश्रम दडलेले आहेत ते सार्थपणे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे, अर्थातच लीडर चांगला हवाच पण टीम देखिल चांगली पाहिजे हे लक्षात येते.
३> आणीबाणीची परिस्थिती, दंगे धोपे दाखवताना त्याचा जेवढा परिणाम झाला पाहिजे तेवढेच दाखवले गेले आहे, 
कुठेही रक्तपाताची किळस येत नाही किंवा अतिरंजित दाखवल्यासारखे वाटत नाही.
४> अगतिकतेतून होणारा मनस्ताप आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी केलेले प्रयत्न विवेक ओबेरॉय ला बऱ्यापैकी दाखवता आलेले आहेत.
५> सिनेमॅटोग्राफी आणि हिमाचल मधले देखावे खूपच सुंदर आहेत.
६> हा सिनेमा समजा पूर्वनियोजित ११ एप्रिल ला प्रकाशित झाला असता तर आज किमान अजून १०-१५ सिट वाढली असती हे नक्की  
पडत्या बाजू-
१> हा एक जीवनपट आहे आणि ज्या व्यक्तीवर हा बेतलेला आहे ती व्यक्ती आपल्या समोर २४ तास आहे, वेग वेगळ्या माध्यमांतून आपण रोज त्यांना भेटतो त्यामुळे - "तुलना" हि अटळ आहे !  ह्या एकाच वस्तुस्थितीमुळे माझा पहिला पडता मुद्दा हा आहे की सिनेमा हा, सिनेमा वाटतो.
टीव्हीवर जीवनपट किंवा नाट्यरूपंतर पाहतो तसा.
२> ह्या व्यतिरिक्त मला तरी काही खटकले नाही.
चित्रपट परीक्षण थोडक्यात :-
चित्रपट सुरू होतो तोच "मोदी चहा" पासून, वडिलांना मदत करून शाळेत जाणारा मुलगा - रेल्वे थांबून लोकं यायची वाट न बघता चहा घेऊन आत जाणारा,  लोकांशी बोलणारा, ऐकणारा, समजून घेणारा. युद्धाच्या घोषणेनंतर रेल्वे ने जाणाऱ्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना चहा देऊन पैसे नाकारणारा आणि सलाम करून भारत माता की जय ! अशी खणखणीत घोषणा देणारा बाल कलाकार हे पात्र चांगले रंगवतो !
तिरंगा पाहून सलाम करणारा मुलगा दुसऱ्या मुलाला समजवून सांगताना मस्त वाटते !! देशप्रेम हे उसने आणता येत नाही,  त्यामुळेच जिवाची पर्वा न करता देशप्रेमाने सैन्यात भरती होणाऱ्या प्रत्येकाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
रा‌.स्व.सं मध्ये जावे की सैनिक बनावे की साधू बनावे ह्या दोलायमान परिस्थितीत असणारा नरेंद्र, एका नाटकात हुंड्याविरोढी बोलतो, तेव्हा त्याला भेटणारे रा.स्व. सं चे वकिलबाबु. त्यांनी दिलेले १० पैसे ( कभी कभी किस्मत आजमा लेनी चाहिये )
मग गाईड चित्रपट पाहून हिमालयात स्वतःच्या शोधात निघालेला नरेंद्र, त्यामध्ये त्याला भेटणारे friend philosopher and guide आणि त्यानंतर राजकारणात प्रवेश !!
रा.स्व. संघाचे काम खूप व्यापक आहे परंतु चित्रपटात ते जास्त दाखवणे शक्य नसल्याची कल्पना होतीच. जेवढे दाखवले आहे ते देखील सुंदर ! नितीन कार्येकर वकिलबाबू च्या भूमिकेत शोभतात ! 
गर्व से कहों हम हिंदु है, 
एक भारत अखंड भारत - सर्व धर्म एकता यात्रा
काश्मीर लाल चौकात तिरंगा फडकवणे, (इथेच सैनिकांशी बोलतानाचा डायलॉग आहे --> देश के लिये जान हाजिर है,  पर ये  पॉलिटिशिअन्स की वजह से हमारे लोग शहिद होते है, हम कुछ कर नही पाते. - जिस दिन साहब हमारी सरकार ने हमारे हाथ खोल दिये ना... अंदर घुस के मारेंगे !  आणि सत्ता आल्यावर पहिल्यांदा जे काम केले ते म्हणजे आर्मी ला मोकळीक दिली दहशतवाद हटवण्यासाठी हे आपल्या लगेच लक्षात येत.. आणि इथपासून सुरू होतात त्या लोकांच्या टाळ्या)
 RSS to BJP to INDIA ह्या Transformation मध्ये आवश्यक असलेले हे सगळे प्रसंग अत्यंत चांगल्या आणि सकारात्मक पद्धतीने दाखवले आहेत.
एक एक युक्त्या करून राजकारणात जम बसवणे, लोकांना आपल्या बाजूने करून घेणे उत्तम दाखवले आहे - ह्या सगळ्ञासाठी तरी एकदा सिनेमा पाहायला हवा, जय-विरू, सेहवाग-सचिन आणि  ह्यांच्यासारखीच सुपरहिट मोदी-शहा जोडी कशी बनते ते पडद्यावर पाहायला छान वाटते.
गोध्रा हत्याकांड, अक्षरधाम हमला, हे सगळे प्लॅन कुठून कसे केले गेले असावेत, एका राज्याला कोंडीत कसे पकडले जाते आणि त्यातून फक्त लोकांच्या विश्वासावर ते राज्य पुन्हा उभे राहते, ताठ मानेने  Vibrant Gujraath समिट घेते, देश विदेशातील लोकांना त्यांचे डेव्हलपमेंट मॉडेल मान्य करावे लागते , आणि हे केवळ प्रबळ इच्छाशक्तीच्या आणि जनतेच्या प्रतिसादाच्या जोरावर हे पाहून प्रत्येक राज्य असे उन्नत का होऊ शकत नाही असा साहजिक प्रश्न मनात येतोच !!
सिनेमातले काही काही डायलॉग आठवणीत राहतात उ. दा. - टाटांसोबतच्या कराराच्या वेळी, "वो क्या है ना सर, जो फैसाला एक मिनिट मे नहीं होता.. वो कभी नही होता !! "
बोमन इराणी ने रतन टाटा उत्तम रंगवले आहेत, ते पाहताना पुन्हा एकदा माझ्यातले "टाटा" प्रेम उफाळून आले...ONCE a TATA ... always a TATA - मी भाग्यवान समजतो की सुरुवातीच्या काळात मी टाटा कंपनीत काम केले जिथे नीतिमूल्य शिकवली गेली जी आजही कामी येत आहेत.
फकिरा, जख्म अभी है निले, देश नही झुकने दुंगा गाणी उत्तम !
शेवटची रॅली मध्ये अतिरेकी हमला होणार हे माहीत असताना केलेले तपास, पाठपुरावे  अत्यंत उत्कंठावर्धक आहेत... १००% मार्क त्या ३० मिनिटांच्या शॉट ला ! काय होणार माहीत असूनही आपण जागेवर खिळून बसतो.
-
माझ्याकडून सिनेमा ला ५ पैकी ४ मार्क्स. - सगळ्या होऊ घातलेल्या टीम लीडर जमातीने पाहावा असा सिनेमा !