म्हणींच्या गोष्टी ... (४)

मराठी भाषेचे  शब्दवैभव, मराठी भाषिकांना आणि मराठीच्या जाणकारांना चिरपरिचित आहे.  विविध प्रकारच्या म्हणी,  वाक्प्रचार आणि सुविचारांच्या अलंकारांची  लेणी मराठी भाषेला लाभलेली आहेत.  काही म्हणी  रोजच्या  संवादात  अगदी सहजपणे वापरल्या जातात. त्या म्हणी कशा प्रचलित झाल्या असाव्यात?  त्यांच्या मागे काय कथा असतील?  तर काही म्हणींच्या या गोष्टी  ...

गुलमोहर सोसायटी, हत्ती आणि 'शेर'

"या वर्ष-अखेरीच्या पार्टीसाठी एक नवीन कल्पना सुचली आहे, " परुळेकर मामा बाल्कनीत येत मला म्हणाले,

"नाही तरी 'व्हर्च्युअल गेट-टुगेदर' आहे, तर फक्त गप्पा मारुया. प्रत्येकानं २०२० मध्ये घडलेली एक तरी सकारात्मक किंवा आनंददायी घटना सांगायची."

"विचार करून सांगतो, " मी म्हणालो.

ऋणानुबंध

"फार लाडावून ठेवलं आहेस बाई तू सगळ्यांना", सासूबाई थोड्या वैतागलेल्या होत्या सुनीतावर.
" किती सुट्ट्या झाल्या वसुधाच्या, पोळीवाल्या सुरेखाच्या"
"अहो आई, खरंच अडचणी होत्या त्यांच्या घरी, नाहीतर मागत नाहीत त्या सुट्ट्या", तिने समजावले.

"आणि वरून परत पैसे हवेच असतात नेहमी"
सुनीताने ऐकून न ऐकल्यासारखं केलं
-------------------------------------------
"हा तुमचा 3 महिन्यांचा पगार, वसुधा मावशी", सुनीताने 1 तारखेला नोटा त्यांच्या हातात ठेवत म्हटले.
"ह्या महिन्यापासून तुम्हाला पगार देणे नाही जमणार, ह्यांची नोकरी अजून सुरू झाली नाहीये"

अज़ीज़ मलिक - एक रसग्रहण

काल-परवाच टीव्ही. वर एक तलत महमूदचं गाणं कुठल्यातरी गलत महमूदच्या आवाजात पुनर्मिसळ केलेलं माझ्या बघण्यात आलं. तो गायक तलत नव्हता हे ऐकताना (नव्हे, ऐकता क्षणीच) कळलं आणि महमूद तरी होता की नव्हता हे कळण्याआधीच मी चॅनेल बदललं. पण तरी ते गाणं ओठांत येत राहिलं आणि त्यामुळे अनेक गोष्टी आठवल्या.
आपल्या आवाजाला जरासा रफ्फू केला की आपणही महंमद रफीसारखे गाऊ शकतो असा समज असलेले अनेक शेख महंमद आमच्या बालपणी होऊन गेले होते. अन्वर, शब्बीर कुमार, महंमद अजीज अशी अनेक नावं त्यांनी धारण केली होती.

सत्य व्यास - सध्याच्या हिंदी साहित्यातील एक आश्वासक नाव

चित्रपटकलेचे
भारतातील जनक दादासाहेब फाळके हे कारस्थानी सिद्धांतवादी (conspiracy
theorist) सोडता इतरांना मान्य व्हावे. त्यात मुंबईला ब्रिटिश भारतात
असलेल्या महत्त्वाच्या स्थानाची भर घातली की मुंबईत चित्रपटव्यवसाय का
फोफावला याची संगती सहज लागते. हिंदी चित्रपटसृष्टीने अनेक सामाजिक
उलथापालथी घडवल्या. मध्य आणि उत्तर भारताच्या कुठल्याही कोपऱ्यातल्या
कुठल्याही सामान्य माणसाला रंगीबेरंगी स्वप्ने दाखवली. आणि एक नवीन हिंदी
भाषा घडवली.