गूढ कथा: "शिकारी रात्र!"

मध्यरात्र उलटून गेलेली असते. वातावरणात खूप थंडी असते. एक बैलगाडी गावाबाहेरच्या निर्मनुष्य मैदानातून चंद्राच्या उजेडात गावाकडे जात असते. अचानक दोन्ही बैलाच्या मधोमध एक भयप्रद कुत्रा येतो आणि गाडीच्या खाली सरकतो आणि दोन्ही चाकांच्या मधोमध चालायला लागतो. बरोबर बैलांच्या वेगात वेग मिसळून तो चालतो. बैलगाडी हाकणारा (नायबा) बैलगाडीवर बसलेल्या दुसऱ्या माणसाला (होयबा) म्हणतो, "या गाडीखाली एक कुत्रा चालत आहे. त्या कुत्र्याला हाकलू नकोस आणि त्याचेकडे बघू नकोस गावची वेस येईपर्यंत! एकदा गावात शिरलो की हा कुत्रा नाहीसा होईल. "

मन

-मन कितीतरी देशात , भावनेत ,कल्पनेत , असल्या -नसल्या… सगळ्याच गोष्टीच जाऊन अडकत ……
कधीतरी खऱ्या  प्रश्नांची उत्तरंहि  घेऊन परत  हि  येत , तर कधी  न सोडविणारी कोडी घेऊनही समाधान भावनेन  परत येतांना सुखद यातानेन  हि भारावत… 
न आवडणारे क्षण आठवून काहीतरी त्यातूनही शिकवून  जांत  तर पुन्हा -पुन्हा  आठवून  देऊन ,खोडचुका  हि पकडून लक्षांत आणूनही  बरोबरीचे अर्थ  जुळवून  नेत …।

कामथे काका (अंतिम भाग ६ वा)

                                किक्लाची धुलाई जोरदार चालू होती. पोलिसावर हात उचलणं, म्हणजे नक्की काय हे त्याला जाणवून देण्यात डावले,  नेटके आणि देखणे अजिबात कसूर करीत नव्हते. बाहेरून पाहणाऱ्या श्रीकांत सरांना अचानक ही मारहाण निरर्थक वाटू लागली. मग त्यांनी 

डावलेंना बाहेर बोलवले. " डावले तुम्हाला राग आलाय, हे ठीक आहे. पण त्याच्याकडून माहिती काढणं जास्त जरूरी आहे.

नवी सुरुवात

दुपारचे 12 वाजलेले असतात. पोलिसांची गाडी धूळ उडवत संतोषच्या झोपडीवजा घरासमोर येऊन थांबते. काही पोलीस आणी ठाणेदार तडकाफडकी गाडीतून उतरतात. संतोषच्या घरात शिरतात, कॉन्स्टेबल विचारतो," संतोष मेश्राम कोण आहे इथे?". अचानक आलेल्या आवाजाने घरातील सारेच दचकतात. संतोष आणी आबा जेवत असतात. संतोषला काहीच कळत नाही तरी पण उत्तर म्हणून," म्या हाय संतोष".