खान काकांस पत्र!

खान काकांस पत्र,
खूप वर्ष एका ठिकाणी राहिलो की आपल्याही नकळत आपोआप काही नाती घट्ट होतात. पाटील काका - राज स्टोअर्स वाले - असेच एक. 
ह्या साथीमध्ये, बाहेर पडणं निषिद्ध झालं तसं आपोआपच त्यांना फोन केला. 
आता ते आधीच सामान बांधून ठेवतात, मग फक्त गाडीने जायचे आणि सामान घेऊन यायचे. हे अगदी सोयीचे होते.
परवा गेलो, तर ते तिथल्या मुलाला उद्देशून म्हणाले, 
"मन्सूर",  "ते पलीकडले ते त्यांचे आहे, दे त्यांना! "

प्रेम म्हणजे नक्की काय ?

प्रेम हा बेहद्द चर्चा झालेला पण अजून कुणालाही नीट न उलगडलेला जीवनातला एक महत्त्वाचा विषय आहे, त्या निमित्तानं लेख.

आपला देश आणि गोपाळ कृष्ण गोखले!

आपला देश आणि गोपाळ कृष्ण गोखले! 
खालील  विधाने पहा! 
१. कानपुरमध्ये शक्यतो चार चाकीचे साइड मिरर फक्त ह्या काळजीने मुडपलेले असतात की मागून येणारा त्याला धडकेल.
२. इंदोर वरून लखनऊला (अंतर ८०० किमी) घेऊन जाणारी एक बस सेवा २८ तास घेते.
३. कथुवा (जम्मू) येथे खारी सदृश एका खायच्या पदार्थाला फेणी म्हणतात आणि तिलाच उत्तराखंड मधील रुद्रपुर येथे मकरी म्हणतात 

लॉकडाऊन माझ्यात आहे, मी लॉकडाउनमधे नाही

लॉकडाऊननी सगळीकडून बांधल्यासारखं झालंय.  
देह, मन आणि काल सगळं बंदिस्त झालं ! 
मन धावेना, पोलिसांच्या दहशतीनं शरीर जखडलं आणि काल एकाजागी थांबला. 
मृत्यूच्या भीतीचं पराकोटीचं थैमान ! मन रमवायचे सर्व उपाय निरर्थक आणि निरस झाले. प्रत्येक शक्यता जन्मताक्षणी संदेहयुक्त झाली.
सगळ्याचा परिणाम शेवटी श्वासावर झालाच ! 
श्वास अवरुद्ध झाला. काहीही होऊ शकत नाही आणि कोणताही प्रयत्न करणं व्यर्थ वाटायला लागलं. 

आमरस आणि कर्मदाळीद्र्य

आमरस आणि कर्मदाळीद्र्य
ह्या मोसमामधला पहिला अंबा घरी आला! 
वाटी भरून आमरस! 
हात सुद्धा लावू वाटतं नाहीत काही अन्नपदार्थ मला, 
फक्त 
"संपतील खाल्लं तर!" 
एवढ्याच भीतीने! 
आमरस हे त्यांमधलंच एक प्रकरण! 
अगदी उच्च म्हणताना थोडी लाज वाटेल 
आणि 
फक्त मध्यमवर्गीय म्हणावं तर काही कमी वाटेल 
असाच आतापर्यंतच वारसा.