`संकल्प'यात्रा!

मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेकांची आसनेही हलली. हल्ली असं काही झालं, की मीडियावाले लगेच चांव चांव करायला लागतात आणि दिवस साजरा करण्यासाठी तेवढ्यापुरता कुणाचा तरी बळीचा बकरा करून टाकतात. पोलिसांपासून अतिरेक्यांच्या कपड्यांपर्यंत सगळ्याचं तपशीलवार "लाइव्ह कव्हरेज' देणाऱ्या मीडियाने एका गंभीर प्रसंगात शिवराज पाटलांना लक्ष्य केलं. त्यांनी दिवसभरात तीनदा कपडे बदलल्याचीच "ब्रेकिंग न्यूज' केली. त्यामुळं तो अनुभव लक्षात घेता, मुंबई हल्ल्याच्या वेळी शिवराज पाटलांनी तीन दिवस कपडेच बदलले नाहीत.

... गेला सूर्यास्त कुणीकडे!

"काय अप्रतिम आलाय फोटो!... रंग कसले सॉलिड दिसतायेत!... मावळत्या सूर्याचा केशरी गोळा बघ ना, काय छान वाटतो फोटोत...!... आणि त्याचं पाण्यातलं प्रतिबिंब... " मी आनंदून म्हणाले.
यावर, माझ्या एकुलत्या एक श्रोत्याचा म्हणजे माझ्या मुलाचा चेहेरा कोराच! मला नाही म्हटलं तरी रागच आला. आदल्याच दिवशी मी काढलेला तो सूर्यास्ताचा फोटो इतका सुंदर आला होता पण जरा कौतुक होईल तर शप्पथ!
"मी काढलाय ना हा फोटो! नाहीच आवडणार तुला... तू काढलेल्या फोटोंचं मात्र मी अगदी तोंडभरून कौतुक करायचं... " मी जरा घुश्श्यातच त्याला म्हटलं.

निखळ सौदर्य जपत पर्यटनाचा वसा

मुर्डी...

मी पाहिलेले गांव, तसं म्हणण्यापेक्षा मला भावलेले गांव म्हणणे जिल्हा रत्नागिरी, दापोली तालुक्यातील मुर्डी... माझं मूळ गांव.
दृष्य पहाण्याची क्रिया डोळ्यांशी थांबते. पण ती अंतरापर्यंत उतरली, घर करून राहिली की ते दृष्य भावतं, तेथे जवळीक निर्माण होते.
मुर्डी, मुळ नांव मरुत्तटी. मरुत म्हणजे डोंगर. डोंगराचे तटी वसलेले गाव म्हणुन मरुत्तटी. असा या नावाचा अर्थ. शिवरायांनी ह्या गावाला भेट दिल्याचा इतिहास आहे.