वर्षानुवर्षे महाराष्ट्रात राहून सुद्धा आपापल्या राज्यांचा अभिमान बाळगणारे म्हणतात की आम्ही हिंदीच बोलणार, मात्र कोणताच मराठी माणूस महाराष्ट्रात (स्वतःच्या राज्यात) राहात असून सुद्धा एकाही परप्रांतातील माणसाला मी मराठीच बोलणार असे म्हणण्याचे धाडस का करू शकत नाही? आम्ही हिंदीच बोलणार असे म्हणणाऱ्यांना उत्तर देण्याइतकाही मराठी बाणाही कुणाकडे उरला नाही का? जे असे म्हणतात त्यांचे पोट ज्यावर चालते तो सिनेमा हिट करणारे पुण्या मुंबईतले मराठी लोकच आहेत. तरीही त्यांची जाहीर मुजोरी अशी की आम्ही तुमचा आणि तुमच्या भाषेचा आदर करत नाही, करणार नाही, काय करायचे ते करा.
आपण मराठीत बोललो तरी परप्रांतीय दुकानदार हिंदीतच बोलतात. मराठी येत असली तरी हिंदीच बोलतात.
प्रत्येक मराठी माणसाने मराठी बोलण्याचे मनावर घेतल्याशिवाय व मराठीचा आग्रह धरल्याशिवाय हे चित्र बदलणार नाही. मला वाटते हा प्रसंग पुरेसा नाही का, त्यांच्या वृत्ती वर प्रकाश टाकण्यासाठी?
काही वर्षांपूर्वी मुंबईत नोकरीनिमित्ताने असतांना नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल चा मराठी पेपर) नावाच्या एका वर्तमानपत्रांत "मराठी राजा, वैऱ्याची रात्र आहे, जागा राहा", हा वासुदेव वसिष्ठ यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. सदराखाली हाच मुद्दा चर्चिला गेला होता. त्यांनी सगळ्यांना यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सांगितले होते.
त्यातही याबाबत मी लिहिले होते. फक्त आजच लिहित आहे असे नाही. जे अनुभवले होते तेच लिहिले होते. आजही त्याचे कात्रण माझेजवळ आहे.
त्यावेळेस लिहिलेल्या संपादकांस पत्रात मी खालील एक प्रसंग सांगितला होताः
एका उत्तर भारतीय सहकाऱ्यासोबत मी मुंबईत राहात होतो. मी बाजूच्या रुममध्ये असतांना त्याचे रुममध्ये एकदा त्याचे काका सहज भेटायला आले होते, तेव्हा त्याने सहज चॅनेल बदलता चुकून झी मराठी लावले. (चुकून लागले). तेव्हा योगायोगाने "मुंबई ते मॉरिशस" हा मराठी सिनेमा लागला होता. तो म्हणाला की, "अरे, ये भुक्कड लोग (म्हणजे मराठी चित्रपटसृष्टी), इनके पास इतना पैसा कैसे आ गया की मॉरिशस मे शुटींग करने गये? " मी त्याला काही म्हणणार तेव्हा त्याचे काकाच त्याला म्हणाले, "ऐसा मत समझ तू, मॉरिशस मे आधा महाराष्ट्र बसा हुवा है" काकानेच त्याची कान उघडणी केली. त्याला नंतर मीही झापले. सोडले नाही. ते असो.
थोडक्यात, त्यांची वृत्ती मराठी ला मुद्दाम कमी मानण्याची आहे. त्यावेळेस मी माझ्या पत्राचा शेवट असा केला होता की, "वैऱ्याची रात्र कधीच संपली असून वैऱ्याची पहाट उगावलीय, काळ्या दिवसाचा संदेश घेवून. "
इतर पत्रलेखकांनीही अशा त्यांच्या वृत्तीवर प्रकाश टाकणाऱ्या गोष्टी लिहिल्या होत्या.
यासंदर्भात माझा मनोगत वरचा एक लेख खालील दुव्यावर वाचावाः