काहीसे अवांतर
मागेही मनोगतावर ईशान्य भारतातली मुले महाराष्ट्रात आणून त्यांना शिकवण्याच्या कार्याविषयी येथे लिहिले गेलेले आहे. तेव्हा तेथे विचारलेला प्रश्न मला येते पुन्हा विचारावासा वाटतो.
जनकल्याण समिती ही ईशान्य भारतातील मेघालय, नागालँड व मणीपूर या राज्यातील लहान मुलां मुलींना महाराष्ट्रात आणून त्यांना येथील शाळांमध्ये १२ वी पर्यंत शिकवण्याचा प्रकल्प राबविते.
हे वाचून बरे वाटले.
ही मुले संस्कारक्षम वयामध्ये इतकी वर्षे मराठी वातावरणात राहून गेल्यावर त्यांच्या भाषेवर, दैनिक जीवनावर त्याचे काय परिणाम होत असतील ह्याबाबत कुतूहल जागृत झाले. विशेषतः परत गेल्यावर तेथे बोलताना, वावरताना, प्रसारमाध्यमांत लिहिताना, सार्वजनिक ठिकाण मतप्रदर्शन करताना, अनेकदा मराठी शब्द, मराठी वाक्प्रचार, म्हणी, बोधवचने इत्यादी अनेक गोष्टींचा प्रभाव जाणवत असेल का? आजूबाजूच्या लोकांवर त्याचा काय परिणाम होत असेल ह्याबद्दल जिज्ञासा निर्माण झाली.
शक्य झाल्यास ह्यावर प्रकाश टाकणारी माहिती द्यावी.
धन्यवाद.