इतिहास तर आहेच पण आम्ही आता एक "उज्ज्वल" भविष्य घडवीत आहोत कारण हल्ली इथे श्वास विसरत चाललायं जगण्याचा अर्थ, रुंदावत चालल्या आहेत इथे माणुसकीच्या कक्षा.
माझ्यामते माणुसकीच्या कक्षा रुंदावत जाणं ही चांगली गोष्ट आहे, पण श्वास जगण्याचा अर्थ विसरणं ही वाईट. मग दोन्ही एका वाक्यात का? कळलं नाही.
हीच, हिच्याच वगैरे उल्लेख सोडले, तर स्वाभिमानी असूनही सहिष्णु विचार वाटतात. लिहिलंय खरंच छान.
जाता जाता १: "मी तोच मराठा ज्या कुळात शिवपुत्र संभाजीच्या नावाने हैदोस घालणारी ..." वगैरे विचार मनात आले. जाउंद्या. माझी स्वतःची भूमिका कळण्यासाठी हे वाचा जमल्यास.
जाता जाता २: वर १९ उद्गारचिन्हं आहेत! नेहमी पडणारा प्रश्न. उद्गारचिन्हांच्या संख्येवर लेखनाचा जोर ठरतो काय???????????