खरेतर मला या लेखाबद्दल जास्त आश्चर्य वाटले नाही. पण येथली काही
साम्यवादी प्रवाहाची मंडळी मराठी भाषेच्या आग्रहाबद्दल/ शुद्धीकरणाच्या
बद्दल बोलताना दिसतात तेव्हा त्या मंडळींबद्दल मात्र आश्चर्य वाटते. स्वभाषेबद्दलची अस्मिता ही स्वधर्म/ स्वराष्ट्राबद्दलच्या अस्मितेपेक्षा वेगळी आहे का? का? जाणकारांनी स्पष्ट करावे.
आश्चर्य वाटायला नको. भाषा जपणे किंवा तसा प्रयत्न करणे म्हणजे अभिमान बाळगणे नाही, असे वाटते. एखाद्याचे मराठीवर प्रेम आहे. पण उर्दू, हिंदी, इंग्रजीही त्याला तेवढीच आवडू शकते. पण जी भाषा -मराठी, उर्दू, इंग्रजी कुठलीही असो- आपण बोलतो, लिहितो आहोत ती आपण धड लिहावी किंवा इतरांकडून धड लिहिली जावी ह्यासाठी प्रयत्न करणे चुकीचे आहे असे वाटत नाही.